प्रश्न तुमचे उत्तर तज्ञांचे
द्राक्ष बागेत काम करतांना अनेक समस्या येतात.या समस्यांसंदर्भात द्राक्ष बागायतदारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची तज्ञांनी दिलेली उत्तरे......
मातीचे आणि देठाचे पृथ:करण नियमीत करणे गरजेचे आहे काय?
-निदान करणे :अशा पध्दतीचे पृथ:करण वेलीमधील अन्नद्रव्यांचा असमतोलपणा, कमतरता व त्यांचे जास्त प्रमाण (विषमता) तपासण्यासाठी केली जाते.असे पृथ:करण केल्यास वेलीतील प्राकृतिक बिघाड कि,जो उत्पादकता कमी करतात,तो समजण्यासाठी मदत होते.कधी कधी वेलीमधील दोन पेक्षा अधिक मुलद्रव्यांची कमतरता आढळल्यास ती ओळखणे अवघड ज़ाते अशा वेळेस देठाचे पृथ:करण करणे जरुरीचे बनते.भुरी सारख्या रोगाचे लक्षण क़ि ज्यात पानांच्या बाहेरील बाजु आतमध्ये वळतात,पालाश कमतरतेशी मिळती जुळती असतात,द्राक्षबागायतदार अशा स्थितीत गोंधळून जातो.वेलीच्या मुळ्य़ांभोवती पाणी साठून राहिल्यास,तेथील हवा खेळती राहत नाही,आणि त्यात जर क्षारतेची भर पडली तर पाने तशीच लक्षणे दाखवतात. अशा पस्थितीत निरोगी वेल व आजारी वेल बाजुला करुन त्यांचे पृथ:करण केले जाते.त्यांचे नमुने एकत्र करण्यासाठी देखील निरोगी व आजारी वेल निवडली जाते.
निरीक्षण : अशा पध्दतीने पृथ:करण हे वेलीमधील अन्नद्रव्याची योग्य रितीने देखरेख करते. जेणे करुन आपणास परिणामी उत्पादन मिळते.यामुळे वेलींना लागणा-या अन्नद्रव्यांची चालु हंगामात गरज आणि अन्नद्रव्यांनवर निष्फळ खर्च कमी करता येतो. आपण सुक्ष्म घड निर्मीतीच्या वेळेस आणि घडांची फुलोरा अवस्थेत देठ पृथ:करण करण्यास शिफारस करतो,यामुळे वेलीमधील घडांचा दर्जा व उत्पादनासाठी लागणा-या अन्नद्रव्यांची निरीक्षणे करावयाची असल्यास, बागेत विशिष्ठ ठिकाण शोधुन प्रत्येक वेळेस त्याच वेलीवरुन नमुने गोळा करावेत.यामुळे अन्नद्रव्यांचे आणि त्यामुळे वेलीच्या उत्पादकतेचे निरीक्षण करणे देखील सोपे जाते.
मातीचे पृथ:करण हे हंग़ाम सुरु होण्य़ापूर्वी आणि खते देण्याआधी करुन घेणे महत्वाचे आहे, यामुळे जमीनीतील सामु,विद्युत वाहकता आणि विशिष्ठ मुलद्रव्यांचे कमी आधिक प्रमाण ओळखता येते,आणि त्याच प्रमाणात त्यांचे व्यवस्थापन करता येते.वेलीवरील संशोधनाद्वारे आपणाला असे निदर्शनास आले आहे की,वेलीतील गरज आणि जमिनीत असलेल्या अन्नद्रव्यांची मात्रा यांचा परस्पर संबंध हा एक सारखा नाही.म्हणूनच वेलीमधील अन्नद्रव्यांचे निरीक्षण क़ऱण्यासाठी देठ पृथ:करण करणे जरुरीचे आहे.
कलम यशस्वी होण्याकरिता कोणती परीस्थीती असावी?
- कलम यशस्वी होण्याच्या दृष्टीने बागेतील वातावरणात तापमान ३५ अंश से.पर्यंत व आद्रता ८० टक्क्यांच्यापुढे असणे मह्त्वाचे असते.खुंटकाडी ही पुर्ण परिपक्व झालेली नसुन,रसरशीत असल्यास त्या काडीतुन कलमजोडाच्या मध्यमातुन सायन काडीमध्ये रस पुढे जाईल व कॅलस लवकर तयार होण्यास मदत होईल.या गोष्टीसोबत कलम करणा-या कारागीराची कुशलता तेवढीच महत्वाची आहे.
कलम करण्याकरिता सायनकाडी (डोळ ) ही स्वमुळावरील की खुंटावरील वेलीवरुन घ्यावी?
- कलम करण्याकरीता सायनकाडी ही कोणत्याही प्रकारच्या वेलीवरुन घेतल्यास हरकत नाही.या मध्ये काडीची निवड क़ऱताना महत्वाचा मुद्दा हा आहे, की सायनकाडी परीपक्व झालेली असावी.ही काडी खुंटकाडीला मॅच होइल व मजबुत,फुगीर डोळे असलेली असावी.
रुटस्टॉक बागेतील काडया फारच बारीक असल्यास दोन काड्यांना जोडुन कलम करता येईल का?
-बागेत पुर्णपणे कलम यशस्वी होण्याकरीता काडीची जाडीसुध्दा तेवढीच महत्वाची आहे.बागेत एक दोन ट्क्के अशा दामनाच्या जाडीच्या( दोन-तिन एम एम) काड्यांनवर कलम करता येईल.यामधे फक्त प्रयत्न करता येईल.काही कलम यशस्वी होईल किंवा नाही याची जास्त खात्री नसेल.बागेत पुर्ण काड्या अशाच असल्यास शक्यतो कलम करु नये.
मी किती प्रमाणात खते वेलींना देऊ?
-वरती सांगितल्या प्रमाणे, वेलींना तंतोतंत प्रमाणात अन्नद्रव्ये देणे,हे वेलीच्या देठाचे व मातीचे परिक्षण क़ऱूण ठरवता येईल.वेलींना देण्यात येणा-या पाण्याचा दर्जा देखील काही प्रमाणात अन्नद्रव्ये व्यवस्थापनात मोलाचा वाटा निभावू शकतो,कारण बरीचशी मुलद्रव्ये ही पाण्यात असतात.याच्या पलीकडे कोणत्याही प्रकारची खते आपणाला द्यावयाची आहेत हे ठरवण्यासाठी पाण्याचा व मातीचा दर्जा देखील कारणीभूत ठरतो.
खुंटावर रंगीत जातीचे कलम करणे योग्य आहे का?
-बागेत असलेल्या पाण्याच्या व मातीच्या बिकट परिस्थीतीमुळे स्वमुळावरील बागेच्या उत्पादनात घट येत आहे.खुंट रोपांचा वापर सुरु झाल्यापासुन उत्पादनात वाढ झाली व सोबतच चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळु लागले.तेव्हा ,द्राक्ष जातीचा विचार न करता बागेत असलेल्या अडचणीचा विचार करुन कोणत्या खुंटाचा वापर करता येईल याकडे लक्ष द्यावे.
कलम केल्यानंतर डोळे फुटण्याकरीता किती कालावधी लागतो?
-कलम केल्यानंतर डोळे फुटण्याकरीता बागेतील वातावरण (तापमान व आद्रता) महत्वाचे असते.त्याच सोबत वापरलेली सायन काडी (डोळाची) कशी आहे, त्या काडीवरील डोळा कसा आहे, यावर ब-याच गोष्टी अवलंबुन आसतात.कलम केल्यानंतर काडी फुटायला साधारण बारा ते आठरा दिवसांचा कालावधी लागतो.
जिरणारा घड कसा समजावा?
-तीन-चार पानांच्या अवस्थेत आपल्याला घड बाहेर येतांना दिसतो.अशक्त घडाच्या तळात बाळी दिसेल व घडाचा आकार गोल दिसेल,रंग फिक्कट पिवळसर,असा घड जिरण्याची शक्यता जास्त असते.याच तुलनेत सशक्त अशा घडाचा आकार लाबट असेल व त्याच्या तळात बाळी नसेल.हा जोमदार असा न जिरणाऱा घड असेल.
घड जिरायला लाग़ताच काय करावे?
-फळछाटणी झाल्यानंतर चांगल्या वातावरणात सहा-सात दिवसानंतर डोळे फुटायला सुरुवात होते.बागेत पोंगा अवस्थेत जर वातावरण बिघडले असेल,म्हणजेच पाउस आला असेल,ढगाळी वातावरण असेल किंवा बागेत पाणी साचले असेल,अशा परीस्थीत वेलीमध्ये शरीरशास्रीय हालचालीमध्ये अडथळे येतात.पोंगा अवस्थेतील डोळ्यात सायटोकायीनचे प्रमाण कमी होउन जिबरेलीकचे प्रमाण वाढते,त्यामुळे घड जिरायला लागतो किंवा गोळी घड तयार होतो.अशा परीस्थीत बागेत सीसीसी व ६ बीए यांसारख्या संजिवकांची फवारणी करुन घड जिरण्यापासुन बागेला वाचवता येते.
फेलफुट क़ाढण्याची योग्य वेळ क़ोणती?
-द्राक्षबागेत तिन ते चार पानांच्या फुटीनिघाल्या की घड दिसायला सुरवात होते.दोन दिवस पुन्हा थांबुन पाच पानांच्या अवस्थेत तो घड (जिरणाऱा क़िवा शसक्त) स्पष्टपणे दिसतो.तेव्हा अशा परीस्थीत फेलफुट काढुन घ्यावी यामुळे काडीतुन वाया जाणारे अन्नद्रव्ये घडाच्या वाढीकरता उपयोगात येईल. ही फेलफुट काढण्याकरीता उशीर होणार नाही,याची बागायतदारांनी काळजी घ्य़ावी,कारण या फुटी जेवढ्या कोवळ्या असतात,तेवढय़ाच अन्नद्रव्ये शोषुन घेण्याकरीता सक्षम असतात.
गडलिंग म्हणजे काय?
गडलिंग म्हणजे काय?
द्राक्षवेलीच्या खोडावरील बाह्य भागास (साल)प्लोएम असे म्हणतात,तर त्याखालील आतील पांढ-या आवरणास झायलेम असे म्हणतात.झायलेम व प्लोयम या भागांतून जमिनीतून तसेच वरून खाली येत असलेल्या अन्नद्रव्याचा पुरवठा हा खोडावर ठराविक जाडीची खाच करून खंडीत केला जातो.खोडावर दोन मि.मी.खोलीची साल विशिष्ट पात्याच्या (चाकू)साह्याने काढली जाते.याच पद्धतीला गडलिंग असे म्हणतात.
गडलिंग कसे व कधी करावे?
गडलिंग कसे करावे व नेमक्या कोणत्या आवस्थेत करावे,असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहतो.सध्याच्या परीस्थित निर्यात होणारी थॉमसन सीडलेस व तास-अ-गणेशवर केलेल्या गडलिंगचे परिणाम चांगले आढळून येतात;परंतु वेगवेगळ्या द्राक्ष जातीमध्ये गडलिंग केल्यानंतर त्या वेलीचा प्रतिसाद वेगवेगळा असतो.त्यामुळे मण्याच्या वाढीची अवस्था व द्राक्ष जात यामध्ये वेळ साधून केलेले गडलिंग मण्यांची जाडी वाढून देण्यास कारणीभूत ठरते.
फुलोरा अवस्थेत केलेल्या गडलिंगमुळे शोर्ट बेरीज प्रमाण जास्त वाढण्याची भीती असते,यामुळे गडलिंग थोडी उशीरा करतो; परंतु मण्यांचा आकार (सेटिगनंतर) प्रत्येक दिवशी वाढतांना दिसतो.उशिरा केलेल्या गडलिंगमुळेसुध्दा चांगले परिणाम आढळून येत नाही.अनेक संशोधन केंद्रात झालेल्या संशोधनाच्या अनुमानानुसार स्पष्ट झाले,की थॉमसन सीडलेस या जातीमध्ये पाच ते सात मि.मी.मण्याच्या आकारमानाच्या वेळी गडलिंग केल्यास,घडाचा आकार वाढून घेतल्यास चांगला फायदा झाला,तर हेच गडलिंग शरद सीडलेस या जाती मध्ये (Black) आठ ते दहा मि.मी.मण्यांच्याआकाराच्या वेळी केल्यास मण्यांचा आकार जास्त वाढल्याचे आढळून आले.माझ्या मते द्राक्षवेलीची गडलिंगची वेळ ही छाटणी पासून दिवस मोजून न करता वेगवगळ्या वातावरणात छाटणीपासून गडलिंगची अवस्था येण्याचा कालावधी कमी-अधिक लागतो त्यामुळे मण्यांची अवस्था पाहूनच गडलिंग केल्यास त्याचे चांगले परिणाम आढळून येतात.मण्यांच्या वाढीच्या या अवस्थेत पेशी विभाजनाचे कार्य जोमात सुरु असते व त्यामुळेच गडलिंगचा परिणाम आढळून येतो.साधारणत: दोन मि.मी जाडीची गोलाकार गडलिंग करून,मण्यांची फुगवण चांगली होते.शक्यतो गडलिंगचा आकार(कमी-जास्त जाडीचे गडलिंग)हा त्या वेळीमध्ये झालेले अन्नद्रव्य ,वेलीचाविस्तार,कार्यक्षम पांढरीमुळी,काडीवर पानांची संख्या इ.गोष्टीवर अवलंबून असतो.कारण गडलिंग करणे म्हणजे वेलीला एक प्रकारची जखम करणे होय.तेव्हा ही जखम शक्य तेवढ्या लवकर भरून येणे सुध्दा तेवढेच गरजेच असते.ही जखम भरून येईपर्यत त्या घडाच्या विकासाकरिता आवश्यक असलेले अन्नद्रव्य वेलीमधून मिळणे महत्वाचे असते.म्हणूनच गडलिंगची जखम तीन आठवडयापर्यत भरून यावी व घडाच्या विकासामध्ये कुठलेही आडथळे येऊ नयेत याकरिता दोन मि.मी पर्यतचे गडलिंग आपल्या जमिनीत फायद्याचे ठरते असे मानले जाते.
गडलिंग करतांना घ्यावयाची काळजी:
द्राक्ष शेतीतील नवे संकट
भारतात सन १९६५ च्या आसपास हरीतक्रांती झाली.शेतीचे उत्पादन प्रचंड वाढवुन अन्नधान्य उत्पादनात देश स्वयंपुर्ण झाला.त्यानंतर जवळपास ३० वर्ष शेतीत नवे नवे प्रयोग होउन उत्पादन वाढले.मागील दशकापासुन मात्र शेतीत विशेष परिवर्तन न होता, शेती उत्पादनात सातत्याने घट येत असल्याचे निदर्शनास येत आहे. पहिल्या पेक्षा शेतक-यांचा शैक्षणिक दर्जा आता उंचवला आहे.प्रत्येक तंत्रज्ञानाचा वापर आता शेतीत होत आहे.परंतु बदलत्या वातावरणात व वाढीव तापमानात शेती उत्पादनातील घट ही चिंतेची बाब झाली आहे.
युरोपीय राष्ट्रांमध्ये शेती तंत्रज्ञान सुक्ष्म पातळीवर पोहचले आहे.तेथील शेतक-यांना प्रत्येक किड-रोगा मागील मुख्य कारण माहित झालेले आहे.व त्या रोगांची आणि किडीची नुकसानीची पातळी देखील अभ्यासली गेली आहे.त्याप्रमाणे भारत मागे असल्याचे निदर्शनात येते.
भारतात १९७२ मध्ये सर्वेक्षण झाले त्यात ७०० सुत्रकॄमी विविध पिकांवर आढळले असुन त्यापैकी महाराष्ट्रात ७५ सुत्रकॄमींच्या हानीकारक जाती आढळ्याल्या आहेत.सुत्रकॄमी बदलत्या वातावरणात आक्रमक झाल्यामुळे दिवसेंदिवस द्राक्ष, डाळींब, टोंमॅटो सहित इतर भाजीपाला , फळपिके व तॄणधान्य प्रभावीत होत आहेत.कॄषी उत्पादनातील होत असणारी घट व वाढत चाललेली खतांची गरज आणि वाढलेले किडरोग व पिकांची क़मी झालेली प्रतिकार क्षमता यामागील नंबर एकचा शत्रु सुत्रकॄमी आसल्याचे लक्षात आले.
विषय»
परिवर्तन,
भारतात,
विशेष,
शेतक-यांचा