खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास nashikgreps.com वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखांची नोंद तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.
Delivered by FeedBurner

द्राक्ष शेतीतील नवे संकट


 भारतात सन १९६५ च्या आसपास हरीतक्रांती झाली.शेतीचे उत्पादन प्रचंड वाढवुन अन्नधान्य उत्पादनात देश स्वयंपुर्ण झाला.त्यानंतर जवळपास ३० वर्ष शेतीत नवे नवे प्रयोग होउन उत्पादन वाढले.मागील दशकापासुन मात्र शेतीत विशेष परिवर्तन न होता, शेती  उत्पादनात सातत्याने घट येत असल्याचे निदर्शनास  येत आहे. पहिल्या पेक्षा शेतक-यांचा शैक्षणिक दर्जा आता उंचवला आहे.प्रत्येक तंत्रज्ञानाचा वापर आता शेतीत होत आहे.परंतु बदलत्या  वातावरणात व वाढीव तापमानात शेती उत्पादनातील घट ही चिंतेची बाब झाली आहे.
  युरोपीय राष्ट्रांमध्ये शेती तंत्रज्ञान सुक्ष्म पातळीवर पोहचले आहे.तेथील शेतक-यांना प्रत्येक किड-रोगा मागील मुख्य कारण माहित झालेले आहे.व त्या रोगांची आणि किडीची नुकसानीची पातळी देखील अभ्यासली गेली आहे.त्याप्रमाणे भारत मागे असल्याचे निदर्शनात येते.
  भारतात १९७२ मध्ये  सर्वेक्षण झाले त्यात ७०० सुत्रकॄमी विविध पिकांवर आढळले असुन त्यापैकी महाराष्ट्रात ७५ सुत्रकॄमींच्या हानीकारक जाती आढळ्याल्या आहेत.सुत्रकॄमी बदलत्या वातावरणात आक्रमक झाल्यामुळे दिवसेंदिवस द्राक्ष, डाळींब, टोंमॅटो सहित इतर भाजीपाला , फळपिके व तॄणधान्य प्रभावीत होत आहेत.कॄषी उत्पादनातील होत असणारी घट  व  वाढत चाललेली खतांची गरज आणि वाढलेले  किडरोग व पिकांची क़मी  झालेली प्रतिकार क्षमता यामागील नंबर एकचा शत्रु सुत्रकॄमी आसल्याचे लक्षात आले.
  आता पर्यत महाराष्ट्रातील किमान ५०० च्या वर मातीचे नमुने व विविध पिकांची सुत्रकॄमी तपासणी करण्यात  आली.त्यात मुळावर गाठी करणारे व मुळावर गाठी न करणारे असे दोन्ही प्रकार  महाराष्ट्रात मोठ्या पीकात (द्राक्षबागे सारख्या) व विविध पिकांवर आढळुन आले आहे. सुत्रकॄमी हे ०.३ ते ०.५ मी.मी इतके लांब सुक्ष्म जंतासारखे आसतात,ते उघड्या  डोळ्याने दिसत नाही.त्यामुळे पिकावर येणारे विविध रोग दिसल्यावर पिकसंरक्षण आपणाकडे केले जाते.सुत्रकॄमी मध्ये नर व मादि असतात.त्याचे  प्रमाण १:१ आसते.मादि २०० ते २५० अंडी मुळावर घालते.२ ते ३ दिवसात त्यातुन जंतासारखे  सुत्रकॄमी बाहेर पडतात. पांढ-यामुळीवर ते स्टायलेट (तोंडाचा भाग) जखमा करतात. त्या जखमावर बुरशी बॅक्टेरीया वाढतात.त्यामुळे द्राक्षवेलीची मुळकुज होते.द्राक्षपिकात मुळकुजीमुळे वेलीचे कुउपोषण होते.मग असे झाड वातावरणानुसार प्रत्येक किडरोगास बळी  पडते. व रोग नियंत्रणाचा खर्च  वाढत जातो.कधी कधी जमीनीतुन अन्नद्रव्ये (खते) देउन देखील अन्नद्रव्याची कमतरता वेल दाखवते.
  ज्या पिकामध्ये करपा,व्हायरस,मुळक़ूज़ व समाधान कारक वाढ दिसुन येत नाही, त्या पिकामध्ये सुत्रकॄमी   मुळावर गाठी करणारे व मुळावर गाठी न करणारे अशा दोन्ही प्रकारे आढळून येतात.
आलीकडच्या संशोधकांच्या निष्कर्षानुसार ट्रायकोडर्मा हर्जीनियम व पॅसीलोमायसिस या बुरशी  सुत्रकॄमींना चांगल्या पैकी नियंत्रणात ठेवल्याचे  आढळुन येत आहे.द्राक्षावरील मुळक़ूज व कमी फुगवण, मर ह्या समस्याचे मुळ सुत्रकॄमी हेच होय. चालु वर्षी  अति पावसामुळे दलदलीच्या  भागात सुत्रकॄमीचे प्रमाण  वाढवुन फुलो-यात असलेल्या बागांची कुज ही  सुत्रकॄमी हे हि एक कारण आहे. तेव्हा सुरवातीच्या दिवसात डेक्सट्रोजबेस (रिप्लेस) सारखे  एकरी १ किलो ह्या प्रमाणात जमीनीतुन द्राक्षवेलीस दिल्यास गुणवत्तापुर्ण व निर्यातक्षम शेती उत्पादन कमी खर्चात व रोगमुक्त वातावरण सहज करता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

निर्माता/लेखक

द्राक्ष बागायतदरांना अतिशय सोप्या भाषेत द्राक्षनिर्याती सबंधी माहिती पुरविणारे संकेतस्थळ! योग्य लागवड व्यवस्थापन असेल,तसेच निर्यातक्षम माल पिकवला ,तर हे पीक चांगला नफा देऊन जाते.परंतू येत्या काळात लागवड वाढून उपयोग नाही,तर प्रति हेक्टरी नफा कसा वाढेल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.

Mobile Phone

Get news on the go Type nashikgreps.com in your mobile phone web browser for free access anytime,from any place. The content is formatted specifically for cell phones and mobile devices.

Creative Commons License
Copyright © 2011 All rights reserved.| privacy-policy |nashikgreps.|RSS Feeds

  © Blogger template Webnolia by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP