द्राक्ष पिकात दोन वेळा छाटणी करावी लागते.पहिली छाटणी ही माल काढल्यानंतर केली जाते, तिला खरड छाटणी ( एप्रिल छाटणी ) असे म्हणतात,तर दुसरी छाटणी ही ऑक्टोंबर महिन्यात घड बाहेर निघण्याकरीता केली जाते,तिला फळ छाटणी किंवा गोडबार छाटणी म्हणतात.निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेण्यासाठी द्राक्ष बागेची काळजी ही खरड छाटणीपासुन घेणे अति महत्वाचे असते.
खरड छाटणी
* खरड छाटणीच्या १५-२० दिवस आगोदर २ ट्रक चांगले कुजलेले शेणखत व १०० ते १२० किलो स्फुरद ( दाणेदार) प्रति एकर द्यावेत.
* खुटावरील द्राक्षबागेस स्वमुळावरील द्राक्षबागेच्या तुलनेत ३-४ दिवस पाण्याचा ताण जादा द्यावा.
* रूट-स्टॉकवरील जुन्या द्राक्षबागेत फुटी एक सारख्या निघण्यासाठी हायड्रोजन साईनाईडचा (डॉरमेक्स,क्रिड्रार) वापर करावा.
* छाटणीनंतर डोळे फुटण्याच्या अवस्थेत उड्द्या करीता कॉन्फीडोर १/२ मि.ली या प्रमाणात फवारणी घ्यावी.
* ५-६ पानांची अवस्था असतांना अशक्त, ड्ब्बलअसणा-या काड्या काढुन प्रत्येक स्क्वेअर फुटास एक काडी राखावी.
* जोमदार वाढीच्या (५-६ पानांच्या) अवस्थेत वाढविरोधक म्हनुन फवारणी घ्यावी.
* बागेला आवश्यक असलेले पाणी उपलब्ध असलेतरच ९ पानांच्या अवस्थेत ६ ते ७ पानांवर सबकेन करावी अन्यथा सरळ काडी ठेवावी.
* ४० ते ५५ दिवसांच्या कालावधीत नत्र बंद करुन पाण्याची मात्रा १/३ कमी करावी.
* ४५ ते ६० दिवसां दरम्यानच्या काळात ५० किलो प्रति एकर पालाश ( SOP) द्यावे,यामुळे द्राक्षकाडी सशक्त होते.
* ५ पाने आणि १२ पाने या अवस्थेत ५० पी.पी.एम युरासिल संजीवकाची फवारणी घ्यावी.
* ४० ते ४५ दिवसांत १० पी.पी.एम ६-बीए ची फवारणी करावी.
* १५ पाने येताच किंवा काडी आडवी पडण्याच्या आत शेंड्याचे पिचींग करुन घ्यावे.
* ऑक्टोबर छाटणी पर्यत पाने टिकवण्यासाठी १/२ % बोर्डॊंमिश्रण सुरुवात करुन पावसाळ्यात १% बोर्डॊ मिश्रणाची फवारणी करत राहावी.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा