द्राक्षबागेत रि-कट घेतांना ज्या ठिकाणी काडीची योग्य जाडी असेल व डोळे फुगलेले कसदार असेल त्या ठिकाणी रि-कट घेउन निघालेल्या फुटीची योग्य निगा राखुन तारेच्या खाली सहा इंचावर पंजा मारावा.
पंजा मारल्या नंतर मुख्य ओलांडे तयार करुन पाच-सहा पानावर शेंडा मारुन पुन्हा पुढे वाढ्वुन घ्यावा.म्हणजेच मुख्य ओलांडे (तरसरी) तयार करतांना सबकेनचा अवलंब करावा.त्याच बरोबर ओलांड्या वरील निघालेल्या बगलफुटी एक आड एक ठेवुन त्यांची पण सबकेन करावी. याच बगलफुटीच्या आपण य़ोग्य निगा राखुन त्यावर लिहोसीन,युरीयासील, व सिक्स बी.ए यांची योग्य प्रमाणात वेग वेगळी फवारणी घ्यावी. पानांची निगा ठेवण्यासाठी बुरशीनाशक तसेच किटकनाशक यांच्या फवारण्या घ्याव्या. फळछाटणी पर्यत पाने टिकविण्य़ासाठी बोर्डॊ मिश्रण दोन -तीन फवाण्या १५ दिवसांच्या अंतराने घ्याव्या.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा