नविन कलम केलेली द्राक्षबाग फेब्रुवारी महिन्यात री-कट घेतल्यानंतर ३५ ते ४० दिवसात तारेजवळ शेंडा पीचिंग (पंजा मारणे) करुन ओलांडे तयार करुन त्यावर मालकाडी तयार केली जाते.हे काम जर वेळेवर करता आले नाही तर फळधारक (माल काड्यांची)संख्या कमी होते.तेव्हा तारेला ओलांडा बांधत असतांनाच निघालेल्या बगलफुटींचा मालकाड्या तयार करण्यासाठी उपयोग करावा.
री-कट घेतांना हा शक्यतो तापमान वाढत असतांना म्हणजेच १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान किंवा ज्या वेळी वातावरणातील तापमान किमान १५ अंश सेल्सिअसच्या पुढे वाढायला सुरुवात होते.आशा वेळी घ्यावा.
री-कट घेतल्यानंतर ३५ ते ४० मि.ली प्रती लिटर या प्रमाणात हायड्रोजन साईनामाईडचे पेस्टिंग करावे.यानंतर डोळे फुटण्याच्या अवस्थेत उडद्या व हिरवी अळी या पासुन संरक्षण करावे.नविन निघालेल्या फुटीपैकी जोमदार फुटी निवडाव्या बांबुला सरळ बांधुन मुख्य तारेच्या खाली ६ इंच ते एक फुट दरम्यान शेंडा पिचींग करुन इंग्रजी व्ही आकाराचे प्राथमिक (मुख्य) ओलांडे तयार करुन घ्यावे. त्यानंतर दुय्यम ओलांडे (तरसरी) तयार करतांना तारेच्या तीन-चार इंच पुन्हा शेंडा पिचींग करावा.ओलांडे तयार करतांना स्टॉप अॅण्ड गो करुन सबकेन प्रमाणे गाठी तयार कराव्या.हे करत असतांनाच निघालेल्या बगलफुटींची पाच पानांवर सबकेन करुन मालकाडी तयार करावी.शक्यतो बगल फुटी ह्या एक आड एक ठेवाव्या.नत्राचा वापर व पाण्याचे नियोजन योग्य ठेवावे. म्हणजे मालकाडी जाड होणार नाही.पाने टिकवून ठेवण्या करीता योग्य बुरशीनाशकांचा वापर करावा.युरीयासिलच्या दोन-तीन फवारण्या घ्याव्यात.पावसाळा सुरु होताच योग्य प्रमाणात बोर्डॊमिश्रणाच्या तीन-चार फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्या.योग्य मालकाडीसाठी किमान १२ ते १५ पाने असावे. तयार केलेल्या मालकाडी पक्व होण्यासाठी पालाशची मात्रा देउन काडी पक्वता करुन घ्यावी.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा