खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास nashikgreps.com वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखांची नोंद तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.
Delivered by FeedBurner

द्राक्षबाग उभारणीतील महत्वाचे टप्पे


नवीन द्राक्ष बाग उभारण्याकरीता अनेक गोष्टींचा सुरवातीपासुनच विचार करावा लागतो. जमीन आणि पाण्याची प्रत, हवामान यानुसार खुंटरोपाचा  वापर करुनच द्राक्ष लागवड  करण्याची शिफारस केली जाते. त्याचा विचार करता सुरवातीपासुनच काळजी घेणे आवश्यक आसते.
द्राक्ष बाग उभारणी मध्ये  रोगांच्या, तसेच घडनिर्मीतीच्या द्धष्टीने हवामानातील घटकांचा(तापमान,सुर्यप्रकाश व सापेक्ष आद्रता)विचार
करणे गरजेचे आहे.
भारी जमीनीत एक दिवसाआड,तर हलक्या जमीनीत रोज पाणी देणे गरजेचे आहे.                  
लागवड करण्यापुर्वी जमीन सपाट करुन ,लव्हाळा व
 हरळी या प्रकारच्या तणांचा नायनाट करुन घ्यावा.
उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असल्यास शक्यतोवर
 ड्रिपरच्या खाली गवत, काडीकचरा,पाचट इ.चा
वापर करुन आच्छादन करावे.शक्यतोवर पाणी किंवा सायं काळी जेव्हा तापमान कमी                                                    असते.अशा वेळी द्यावे.
ज्या भागात सतत पाउस सुरु असतो किंवा
वाढीच्या अवस्थेत आद्रता जास्त काळ टिकून राहते अशा ठिकाणी
 रोगांचा प्रादुर्भाव जास्त होउ शकतो.तेव्हा शेजारच्या जागेत जास्त आद्रता
निर्माण करणारे पीक टाळावे.
वाढीच्या दुस-या टप्प्या मध्ये मुळांचा चांगला विकास होईल,या दॄष्टीने स्फुरदाची उपलब्धता करुन द्यावी.
खुंटरोपाच्या प्रत्यक्ष लागवडीच्या साधरणता एक महिण्यापुर्वी चारी घ्यावी.                              खुंटरोपाची पाने जुनी होतांना तांबेराचा प्रादुर्भाव दिसु शकतो.तेव्हा योग्य उपाय करावा.          
रुटस्टॉक लागवड ही वातावरणातील
 तापमान १५ अंश सेल्सीअसच्या पुढे जायला
सुरवात होते.अशा वेळी करावी.                                                      
कलम जमीनी पासुन दिड ते दोन फुट अंतरावर केले जाते.या ठिकाणी काडीची जाडी आठ-दहा मि.मी मिळणे आवश्य आहे.           
खूंटरोप लागवड केल्यानंतर नविन मुळे फुटे पर्यंत व नविन फुट दिसे पर्यंत  फक्त पाणी द्यावे.                                        खुंटरोपाची काडी परीपक्व होण्य़ासाठी पालाशची योग्य
मात्रा द्यावी.
खुंटरोपांच्या मुळांचा जमीनीमध्ये  चांगल्या
 रीतीने विकास होण्याकरीता सुरवातीचे ५० ते ६०                                    दिवस वरच्या फुटीची वाढ होउ द्यावी.
कलम करते वेळी खुंट रोपाची काडी  रसरशीत   असणे आवश्यक आहे.
लागवडीच्या ६० दिवसा नंत्तर खुंटरोपांचा
जमीनी  पासुन खरड री-कट घ्यावा. नंतर
निघालेल्या नविन फुटी पैकी तीन-चार सरळ चांगल्या रोग व किडमुक्त अशा फुटी बांबुला बांधाव्यात. 
शक्यतो कलम करण्यापुर्वी एक महिना आगोदर शेणखत + सुपर फॉस्फेटची योग्य मात्रा द्यावी.                                      
खुंटरोपाची   शाकीय  वाढ  होण्याकरीता नत्र  व  स्फुरदाची  योग्य  मात्रा  देउन  पाण्याचा वापर  भरपुर करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

निर्माता/लेखक

द्राक्ष बागायतदरांना अतिशय सोप्या भाषेत द्राक्षनिर्याती सबंधी माहिती पुरविणारे संकेतस्थळ! योग्य लागवड व्यवस्थापन असेल,तसेच निर्यातक्षम माल पिकवला ,तर हे पीक चांगला नफा देऊन जाते.परंतू येत्या काळात लागवड वाढून उपयोग नाही,तर प्रति हेक्टरी नफा कसा वाढेल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.

Mobile Phone

Get news on the go Type nashikgreps.com in your mobile phone web browser for free access anytime,from any place. The content is formatted specifically for cell phones and mobile devices.

Creative Commons License
Copyright © 2011 All rights reserved.| privacy-policy |nashikgreps.|RSS Feeds

  © Blogger template Webnolia by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP